मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

व्यक्तिगत समुपदेशन !


व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनी व्यक्ती दाखल झाल्यावर सुरवातीचे सुमारे आठ दिवस त्याला त्याचे व्यसन न मिळाल्यामुळे अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास उद्भवतात ...शास्त्रीय भाषेत या त्रासांना विरहलक्षणे ( विड्रॉवल सिम्पटम्स ) असे म्हणतात..यात प्रामुख्याने घाबरल्या सारखे होणे .. रक्तदाब वाढणे किवा कमी होणे ..अंग दुखणे ..हातापायांची थरथर होणे ..भूक न लागणे ..आम्लपित वाढून उलट्या होणे ..जुलाब होणे ..झोप न लागणे ...ही लक्षणे असतात ..काही लोकांना या अवस्थेत फिटस ( फेफरे ) देखील येवू शकतात ..कारण मेंदूला व्यसनाची सवय झालेली असल्याने ..एकदम व्यसन बंद झाले कि मेंदू त्याचे काम नीट पाने करत नाही व एकदम झटका बसल्यासारखी फिट येवू शकते .. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता वेगवेगळी असते .त्यामुळे सर्वांनाच फिट येईल असे नाही ..मात्र येणारच नाही असेही नसते .. व्यसनामुळे मेंदूची नेमकी किती हानी होतेय हे मोजण्याचे नेमके साधन सध्या तरी उपलब्ध नाहीय ..त्यामुळे कोणताही व्यसनी आपल्याला कधीच फिट येणार नाही असे म्हणू शकत नाही ..केव्हातरी त्याचा मेंदू त्याला दगा देतो ...फिट येणे ( इपिलेप्सी ) हा एक आजार आहे मात्र व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत फिट येणे हे व्यसनामुळे मेंदूचे नुकसान होत असल्याचे प्रमाण आहे .. ..तो मेंदूने व्यसनाच्या बाबतीत दिलेला सावधगिरीचा इशारा असतो ..त्यापुढेही व्यसन थांबले नाही तर ..मेंदू हमखास केव्हाही दगा देणार व जीवन धोक्यात येणार हा निश्चित ...फिट येण्याप्रमाणेच एक हँलुस्नेषन नावाचा प्रकार काही व्यासानिमध्ये व्यसन न मिळाल्यास उद्भवतो ..म्हणजे नियमित व्यसन न मिळाल्याने व्यसनी व्यक्तीचा मेंदू त्याचे नियमित काम नीट करत नाही व त्या व्यक्तीला वेगवेगळे भास होतात ..( माझ्या ब्लाँगवर 'बेवड्याची डायरी ' या भागात मी याबद्दल सविस्तर लिहिलेच आहे ) ..अश्या वेळी व्यसनी व्यक्तीची काळजी घेण्याची गरज असते ..


विरहलक्षणांच्या या काळात व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्राच्या बाहेर जाण्याची खुप ओढ असते ....तो व्यसनमुक्ती केंद्रातील कार्यकर्त्यांच्या कडे घरी फोन करण्यासाठी ..डिस्चार्ज साठी ..बाहेर जाण्यासाठी खूप हट्ट करतो ..अशा वेळी त्याला वेळोवेळी धीर देवून हा त्रास फक्त काही दिवसांचा आहे हे समजावून सांगावे लागते ..त्रास सहन करण्यासाठी जरी औषधे दिली गेली असली तरी त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम समुपदेशनाने अधिक चांगल्या प्रकारे होते ...तू लवकरच या त्रासातून बाहेर पडून चांगला होशील ..व्यसनमुक्त होशील ..तुला काहीही त्रास झाला तरी आम्ही तुझी काळजी घेत आहोत असे त्याला वारंवार पटवून द्यावे लागते ..त्याच्या फोन करण्याच्या किवा घरी जावू देण्याच्या हट्टाला बळी न पडता ..सहनशीलपणे त्याला हाताळावे लागते ..अशा काळात जर त्याचे कुटुंबीय त्याला भेटले तर तो त्यांना इमोशनल ब्लँकमेल करून ..दमदाटी करून ..खोट्या शपथ वचने घेवून डिस्चार्ज घेण्यास भाग पाडू शकतो म्हणून पालकांनी या काळात व्यसनी व्यक्तीशी अजिबात संपर्क साधता कामा नये ..व्यसनमुक्ती केंद्रात व्यक्ती दाखल झाल्यावर सुमारे पंधरा दिवसानीच पालकांनी त्याची भेट घेतली तर अधिक बरे असते ..तेदेखील समुपदेशकांच्या सूचनानुसारच भेटले पाहिजे ..मात्र काही पालक त्या व्यसनी व्यक्तीच्या बाबत इतके हळवे किवा संवेदनशील असतात की ते व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्यापासून खूप अवस्थ होतात ..वारंवार व्यसनमुक्ती केंद्रात फोन करून ..जेवला का ? झोपला का > काय जेवला ? काही म्ह्णतो का ? आम्हाला दोष देतो का ? असे प्रश्न विचारून तसेच त्याच्याशी आम्हाला बोलू द्या म्हणून हट्ट करतात ..खूप वैताग येतो..अशा पालकांना उत्तरे देण्यास व त्यांना भेटू नका म्हणून समजावून सांगता सांगता कार्यकर्त्याच्या नाकीनऊ येतात ...तेव्हा आपला माणूस एकदा व्यसनमुक्ती केंद्राच्या ह अवली केल्यावर तेथील समुपदेशक व कार्यकर्ते यांच्या सूचनानुसार पालकांनी वागले तरच यश मिळण्याची शक्यता वाढते .

विरहलक्षणे संपल्यावर देखील व्यसनी व्यक्तीला समुपदेशनाची गरज असते .. त्याच्या आयुष्यात त्याने नेमक्या काय चुका केल्या हे त्याला शोधण्यास लावणे ..त्याचुका स्वीकार करून पुन्हा त्या चुका न होण्यासाठी सकरात्मक दृष्टीकोन देणे ..वेळोवेळी निर्माण होणार्या भावनिक आवेगांशी जुळवून घेण्याचे तंत्र ..त्याच्या व्यसनामुळे झालेल्या नुकसानाची ..इतरांचा झालेल्या त्रासाची ..त्याचा अहंकार न दुखावता त्याला जाणीव करून देणे ..भविष्यकाळात व्यसनमुक्त राहून नवीन आयुष्य उभारण्यासाठी आत्मविश्वास व मार्गदर्शन करण्याचे काम सामुपदेशकाचे असते ..या सर्व काळात व्यसनी व्यक्ती आणि समुपदेशक यांच्यात एक विश्वासाचेनाते निर्माण होते ..त्यासाठी समुपदेशकाने सावधगिरीने बोलणे महत्वाचे असते ..व्यसनी व्यक्तीचा अहंकार न दुखावता ..त्याला दोष न देता ..किवा त्याच्या भावनांमध्ये वाहून न जाता अलिप्तपणे हे सर्व करण्यासाठी समुपदेशकाकडे खूप समंजसपण असणे गरजेचे असते .

( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा