मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

योग्याभास व प्राणायाम !


व्यसनमुक्ती केंद्रातील अजून एक महत्वाचा उपचार म्हणजे योगाभ्यास आणि प्राणायाम म्हणता येईल ..महर्षी पतंजली यांनी विकसित केलेले योगशास्त्र आज सवर्दूर मान्यता पावलेले आहे ..योग हा शब्द युज या संस्कृत शब्दावरून आलेला आहे ..युज म्हणजे जोडणे असे म्हणता येईल ..शरीर आणि मन यांच्यात योग्य समन्वय साधण्याचे प्रमुख कार्य योगाद्वारे होते ..मानवी मन मुळातच अतिशय चंचल असते त्यात व्यसनी व्यक्ती म्हंटली की त्याचे मन तर अति चंचल असते .. त्यामुळे एखादी गोष्ट मनावर घेवून ती निभावण्याची त्याची क्षमता संपुष्टात आलेली असते ..तसेच निरनिराळी व्यसन केल्याने त्याचे शरीर देखील दुबळे होत जाते ..स्नायूंची क्षमता ...रक्तवाहिन्यांची क्षमता ..कमी झालेली असते ..व्यसनमुक्ती केंद्रात योगाभ्यास केल्याने या सर्व व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत मिळते ..तसेच मनाची एकाग्रता देखील वाढते ..योगशिक्षक देत असलेल्या सूचनानुसार असणे करणे हितावह असते ..व्यसन मुक्ती केंद्रात व्यसनी व्यक्तीला झेपतील अशा प्रकारची आसने त्याच्याकडून करवून घेतली जातात ..विशेषतः स्नायुंना बळकटी देणे ..शरीराच्या हालचाली सहजतेने घडवून आणणे ..पचनशक्ती सुधारण्यास मदत करणे ..आणि मनाची शांती ..प्रसन्नता टिकवणे ही कार्ये प्रामाणिक पणे योगाभ्यास केल्यास साध्य होतात .


प्राणायाम -

मानवी शरीर जिवंत ठेवण्यासाठी अनेक यंत्रणा निसर्गाने आपल्या शरीरात कार्यरत ठेवल्या आहेत ..श्वासोश्वास ही त्यापैकी प्रमुख यंत्रणा आहे ..प्रत्येक श्वासाद्वारे प्राणवायू किवा उर्जा आपण शरीरात घेत असतो ...श्वास घेताना आणि सोडताना विशिष्ट पद्धतीने तो घेतला गेला तर शरीरात घेतल्या जाणार्या उर्जेचे योग्य नियमन करता येते व त्या उर्जेचा उपयोग शरीर व मन सशक्त करण्यासाठी मदत करता येते हे आता सर्वज्ञात आहे ..अनुलोम विलोम ..कपालभाती ..भस्त्रिका ..भ्रामरी ..असे प्राणायाम नियमित केले तर अनेक फायदे होऊन व्यसनी व्यक्तीला असामान्य अशी शक्ती मिळत जाते ..ही शक्ती तो व्यसनमुक्त राहण्यासाठी आणि अधोगतीकडे चाललेले जीवन प्रगती पथावर नेण्यासाठी वापरू शकतो . अर्थात योगाभ्यास आणि प्राणायाम या दोन गोष्टी कोणालाही सहज करता येण्यासारख्या असूनही ..उगाचच असा सर्वसाधारण गैरसमज आढळतो की या गोष्टी योगी पुरुषांनी ..साधू सन्यासी लोकांनी करायच्या असतात ..सर्वसामान्य माणसाचे हे काम नव्हे ..या गैरसमजांमुळे अनेक लोक या बाबतीत जरा टाळाटाळ करण्याच्या प्रवृत्तीचे असतात ..व्यसनमुक्ती केंद्रात देखील उपचार घेणारे मित्र बहुधा योगाभ्यास आणि प्राणायाम करण्याचा कंटाळाच करतात ..तसे न करता जर मनापासून या उपचारात सहभाग घेतला तर नक्कीच सुधारणा अधिक सोपी होते ..वाचकांनी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असणारी या विषयावरची पुस्तके वाचली तर त्यांना बरीच उपयुक्त माहिती मिळेल .

समूह चर्चा -

व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असलेल्या मित्रांची जात.. धर्म..संस्कृती ..शैक्षणिक अथवा आर्थिक स्थिती ..वैवाहिक स्थिती ..वगैरे जरी वेगवेगळी असली तर सर्वांची समस्या आणि झालेले नुकसान मात्र सर्वसाधारण सारखेच असते ..अश्या वेळी व्यसनांचे जीवघेणे आकर्षण ..त्यावर मात करण्यासाठी असणारी मानसिकता ..पुन्हा व्यसनाकडे जाण्यास प्रवृत्त करणारी परिस्थिती ..बचाव करण्याच्या पद्धती ..भावनिक असंतुलन ..जीवनाबद्दलचा अविवेकी दृष्टीकोन ..अश्या विविध विषयांवर समूह उपचारक समूहात चर्चा घडवून आणण्याचे काम करतो ..या द्वारे व्यसनी व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो ..तसेच व्यसनाधीनता या आजाराची सखोल माहिती मिळून ..स्वतःला सांभाळण्यासाठी आपण नेमके काय काय करू शकतो हे त्याला समजण्यास मदत मिळते ..व्यसनाधीनतेमुळे होणार्या नेमक्या हानीची स्पष्ट कल्पना येवून ..आपण क्षणिक आनंदासाठी केवढा मूर्खपणा करत होते हे लक्षात येते .

( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा