शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

राजकीय पालखी ( दोन )

राजकीय पालखी ( दोन )
सुमारे पंधरा मिनिटे आम्ही खाली अवस्थतेने वाट पहात होतो ..शेवटी आमची प्रतीक्षा संपली ..जिन्यावरून आमचे कार्यकर्ते एका तगड्या व्यक्तीला घेवून येताना दिसले ..नरेंद्रने मागून त्याची पँट कमरेजवळ घट्ट पकडलेली ..तर राजूने त्याचे बखोट धरलेले ..अॅडमिशन फॉर्म वर पालकांची सही ..वगैरे सोपस्कार आधीच उरकलेले होते ..पटकन आम्ही त्याला गाडीत बसवून गाडी सुरु केली . व्यसनीला त्याने काही गडबड करू नये म्हणून एकदम मागच्या सीट वर बसवले ..त्याच्या दोन्ही बाजूला नरेंद्र आणि राजू बसले ..पालखी साठी आम्ही नेहमी मोठी गाडी नेतो जेणेकरून आमचे पाच सहा कार्यकर्ते आणि व्यसनी आरामात प्रवास करू शकतील ..त्यावेळी आमच्याकडे मारुती ' वर्सा ' गाडी होती ..आता ' झायलो ' घेतलीय ..आमची पोलिसी भूमिका नीट वठण्यासाठी अशा प्रसंगी आम्ही पोलिसी खाक्यानुसार मोजकेच बोलतो ..मी नरेंद्रला विचारले " झडती ली क्या उसकी ? कुछ हथियार मिले या नही ? .." नही सहाब ..हथियार नही मिले ..लेकीन ब्राऊन शुगर की पुडिया मिली है..ये ब्राऊन शुगर बेचता है..एक ग्राहक भी था इसके साथ में..उसको छोड दिया ..वो बेचारा पीनेवाला था .." नरेंद्रने त्याला ' बेचनेवाला ' असे संबोधून ' पेडलर ' वर्गात टाकले ..तो अजूनच घाबरला ..गरीब आदमी हू ..मै बेचता नही ..केवल पिता हु ..आप चाहे तो बिलासपुर के सभी बेचनेवालो के नाम पते बताता हु आपको अशी गयावया करू लागला ..मग आम्ही पोलिसी रूबाबत त्याचे घरदार .नातलग ..कामधंदा ..जमीन जुमला याची चौकशी करू लागलो ..त्याला विचार करायला वेळ मिळू नये म्हणून सारखा प्रश्नांचा भडीमार करावा लागतो ..त्याने नातलगांबद्दल खरी खुरी माहिती दिली ..मात्र जमीन जुमला ..कामधंदा वगैरे बद्दल खोटे सांगू लागला ..बेरोजगार हु ..भाडे के घर में रहेता हु ..वगैरे सांगू लागला ..आपण पोलिसांच्या ताब्यात आहोत याचे त्याल भान होते ..आपण श्रीमंत ..शेतीवाडी वाले आहोत ..हे सांगणे टाळले त्याने ..कदाचित आम्ही मोठी ' तोडी ' करू नये याची खबरदारी घेत होता ..गरीब हु ..मुझे छोड दो .. आपको खुश करुंगा ..असे म्हणू लागला ' साले रिश्वत की बात करता है म्हणून आम्ही त्याला झापले ..अशा वेळी सेंटरला पोचे पर्यंत..किमान नागपूर शहरात प्रवेश करेपर्यंत ..आम्हाला पोलीस असल्याचे नाटक आमच्या एकमेकांच्या संवादातून सूर ठेवावे लागते ..वाटेत आम्ही नैसर्गिक विधी ..जेवण ..नाश्ता..या करता थांबणे टाळतो..हे सगळे आधीच उरकून घेतो .
सुमारे अकरा तास प्रवास करून आम्ही एकदाचे सेंटरला पोचलो ..त्याला आम्ही पोलीस नसून व्यसनमुक्ती केंद्राचे कार्यकर्ते आहोत हे समजले तेव्हा .धक्काच बसला ..बराच वेळ तो नुसताच स्तब्ध राहिला ..आपण असे कसे फसलो ..इतके कसे मूर्ख बनलो .या बद्दलचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता ..मग आम्हला धमक्या वगैरे दिल्या .अमुक ढमुक मंत्री माझा नातलग आहे ..तुम्हाला खूप पश्चाताप करावा लागेल वगैरे ..आम्ही त्याला सांगितले ..सध्या तू आमच्या ताब्यात आहेस ..तुझ्या नातलगांच्या संमतीनेच तुला येथे आणले आहे ..तुला जे काही करायचे ते तू बाहेर गेल्यावर करू शकतोस ..तोवर तुला आमचे म्हणणे ऐकावे लागेल ..असे बजावले ..त्याचा नाईलाज झाला ..मात्र आता बाहेर पडल्यावर सर्वात आधी बायकोला घटस्फोट देणार असे त्याने जाहीर केले ..तसा निरोप द्या तिला माझ्यातर्फे असे सांगितले ..आम्हाला हे सर्व अपेक्षितच असते ..त्याला आम्ही ब्राऊन शुगरची ' टर्की ' जास्त होऊ नये म्हणून व्यवस्थित औषधे दिली ..तो चारपाच दिवसांनी उपचारात सहभागी होऊ लागला ...योग ..प्राणायाम ..समूह चर्चा ..व्यक्तिगत समुपदेशन या मुळे मनातील नकारात्मक विचार कमी होत गेले ..त्याला किमान दोन काहीने तरी उपचार द्यावे असे कुटुंबियांचे म्हणणे होते ..मध्ये एकदा नातलग भेटून गेले तेव्हा त्याने हट्ट केलाच घरी जाण्याचा ..परंतु नातलग ठाम राहिले ..एक महिना तरी रहावेच लागेल असे त्याला सांगितले ..
उपचारांचा एक महिना पूर्ण होऊन गेल्यावरही आपल्याला सोडत नाही हे पाहून त्याने .. तब्येत बिघडल्याची नाटक केले ..मुद्दाम चक्कर येवून पडल्यासारखे खाली पडला ..मग तसाच उताणा डोळे मिटून बेशुद्ध झाल्यासारखा पडून राहिला ..आमच्या उपचारी मित्रांनी ..कार्यकर्त्यांनी खूप हाका मारल्या ..त्याला हलवले तरी डोळे उघडायला तयार नाही गडी..कार्यकर्त्यांनी मला बोलावले ..मी त्याच्या डोळ्याच्या पापण्या बोटांनी उघडून बुबुळे पहिली ..तर बुबुळे चांगलीच फिरत होती ..हे नाटक आहे हे मला समजले ..काही नाही ..याला बांधून ठेवा पलंगाला दोन दिवस असे मुद्दाम मोठ्याने कार्यकर्त्यांना सूचना दिली ..तसे तो हालचाल करू लागला ..अभी ठीक हु असे म्हणू लागला . दोन महिने पूर्ण झाल्यावर त्याचा डिस्चार्ज झाला ..या दरम्यान तो आमचा मित्र बनला ..या घटनेला आता नऊ वर्षे उलटून गेली ..तो छान व्यसनमुक्त रहात आहे ..राजकारण आपला प्रांत नाही म्हणून सोडून दिलेय ..शेतीवाडीत लक्ष देतोय .. नंतर त्याने बिलासपुर हून सुमारे दहा जण उपचारांना पाठवले आमच्याकडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा