मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

महागडे आॅम्लेट ( भाग दोन )


आमच्याकडे जबरदस्तीने उचलून आणून उपचारांना दाखल दाखल केल्यावर बहुतेकांना एकदम साक्षात्कार होतो आपल्या घरातील वाईट वर्तनाचा..दारू पिणे चांगले नाही याचा ..ते लगेचच जाहीर करतात ..आता मी दारू सोडली म्हणून ..अर्थात हे तात्पुरते असते ..व्यसनमुक्ती केंद्रातून ताबडतोब आपल्याला सोडून द्यावे म्हणून व्यसनी वेळ प्रसंग पाहून पावित्रा बदलतो ..यानेही उपचारांच्या दरम्यान आमच्याकडे स्वता:च्या चुकांची कबुली दिली ..सर्व उपचारात सामील होत ..आम्हाला चांगले सहकार्य केले .. ..समुपदेशनाच्या वेळी त्याला आम्ही विचारले त्याच्या पायलट होण्याच्या स्वप्नाबद्दल ..तुझ्या वडिलांचा पगार किती ? तसेच लहान बहिणीच्या लग्नाला येणारा संभाव्य खर्च ..त्यातून तुला पायलट करण्यासाठी लागणारा भरपूर पैसा वडील कोठून आणणार ? यावर त्याच्या कडे उत्तर तयार होते ..वडिलांच्या वाट्याला आलेली तीनचार एकर वडिलोपार्जित जमीन विकून वडिलांनी आपले स्वप्ना पूर्ण करावे असा त्याचा हट्ट दिसला ..बहुतेक व्यसनी व्यक्तींचा वडिलोपार्जित संपत्तीवर डोळा असतो ...तसेच कुटुंबाच्या संपत्तीबाबत तो अतिशय जागरूक असतो ..त्यातील आपला हिस्सा त्याच्या चांगलाच लक्षात असतो ..परंतु निसर्गाने दिलेल्या सगळ्यात किमती शरीराचे महत्व त्याला समजत नाही .. त्याला वडिलोपार्जित जमिनीशी वडिलांच्या भावना भावना कशा निगडीत असतात ..तसेच ती जमीन एखाद्या मोठ्या आजाराच्या वेळी .. आर्थिक अडचणीच्या वेळी उपयोगी येवू शकते म्हणून वडील ती विकण्यास नकार देत आहेत हे त्याच्या गळी उतरवावे लागले ..एकंदरीत सगळे समजून घेतले त्याने ..मग त्याने डी एड करणे वडिलांच्या दृष्टीकोनातून कसे व्यवहार्य आहे ..शिक्षकी पेशा कसा आदर्श आहे ..तू मुळचा हुशार आहेस उत्तम शिक्षक होऊ शकतोस याची वडिलांना खात्री आहे वगैरे ..समजावले ..त्याला सगळे पटतेय असे वाटले ..त्याचे वार्डातील वर्तन देखील चांगलेच होते ..आम्ही वार्डात आमचे गुप्तचर सोडलेले असतात ..ते गुप्तचर कार्यकर्ते ..उपचार घेणाऱ्या प्रत्येक व्यासानीचे बारकाईने निरीक्षण ( क्लिनिकल आॅब्जर्व्हेशन ) असतात ..त्यांचा देखील याच्या बाबतीत सकारात्मक अहवाल मिळाला होता म्हणून आम्ही याला एक महिना उपचार पुरेसा आहे असे ठरवून एका महिन्यांनी डिस्चार्ज दिला ..पालकांना डिस्चार्ज च्या वेळी ..याने परत काही हट्ट केला ..किवा काही गडबड केली तर आम्हाला फोन लावून द्या ..आम्ही त्याला समजावून सांगू अशी सूचना दिली ..
नंतर सुमारे तीन महिने सुरळीत गेले ..हा नोकरी साठी प्रयत्न करतोय असे समजले वडिलांकडून ..चला आता हा मार्गी लागेल असे वाटले आम्हाला ..पण कसचे काय ..चार दिवसांनी वडिलांचा दुपारी फोन आला की तो सकाळ पासून घरातून गायब आहे ..घरातून सकाळी एक हजार रुपये चोरून त्याने पोबारा केला होता ..वडिलांनी सविस्तर माहिती सांगितली फोन वर ..हा म्हणे गेल्या दोन दिवसांपासून मला ' आॅम्लेट ' खायची इच्छा आहे त्यासाठी मला पन्नास रुपये द्या म्हणून मागे लागला होता ..त्यांच्या घरी ' माळकरी ' वातावरण ..वडिलांनी त्याला स्पष्ट नकार दिला ..दारू सोडलीस तसे आता हे नॉनव्हेज खाणे देखील सोड असे बजावले ..बहुधा सर्वच व्यसनींना दारू सोबत ' नॉनव्हेज ' खाण्याची सवय असते ..अनेकदा दारू बंद असली तरी त्यांना ' नॉनव्हेज ' खायची इच्छा होऊ शकते ..यात हा देखील धोका असतो की नॉनव्हेज खाताना दारू प्यायची पण इच्छा होते ..वडिलांनी नकार दिल्यावर दोन दिवस याने कटकट केली घरी ..तेव्हा वडील याला रागावले ..त्याने पूर्वी किती त्रास दिला आहे हे त्याला सुनावले ..त्याला तो अपमान वाटला ..त्याचे डोके फिरले ..सकाळी घरातून एक हजार रुपये चोरून तो पळाला ..तासाभरात वडिलांच्या लक्षात आले चोरी झाल्याचे ..नंतर दुपारी याचा दारू पिवूनच फोन आला ..तुम्ही मला आँम्लेट खायला पैसे दिले नाहीत म्हणून मी एक हजार रुपये घरातून चोरून ..दुसऱ्या गावी मित्राकडे आलोय ..मग वडिलांना त्याने शिव्या घातल्या ..माझ्या आयुष्याचे तुम्ही वाटोळे केले वगैरे आरोप केले ..एकदा याचे पिणे सुरु झाले की याला थांबता येत नाही हे माहित होते वडिलांना ..त्यांनी आम्हाला लगेच संध्याकाळी तुम्ही निघून मागील वेळे सारखे मध्यरात्री पोचा येथे ..तोवर तो हजार रुपयांची वाट लावून ..भरपूर दारू पिवून आणि पोटभर आॅम्लेट खावून घरी आलेला असेल ..त्याला पुन्हा घेवून जा उपचारांना असे सांगितले ..खरेतर आम्ही डिस्चार्जच्या वेळीच वडिलांना सूचना दिल्या होत्या की याने काही कटकट केली तर आम्हाला कळवा ..आम्ही त्याला समजावून सांगू म्हणून ..परंतु वडिलांनी आम्हाला तो ' आॅम्लेट ' खायचा हट्ट करतोय हे कळवले नव्हते ..त्यातून पुढे हे लफडे झालेले ..आम्ही ताबडतोब संध्याकाळी निघालो ..मध्यरात्री त्याच्या घरी पोचलो तेव्हा समजले की तो अजून घरी आलेला नव्हता ..कदाचित वडिलांनी आम्हाला फोन केल्याचा त्याला अंदाज आला असावा ..कारण त्याने एकदा रात्री दहा वाजता फोन करून वडिलांना परत शिव्या घातल्या होत्या ..मैत्रीच्या लोकांना सांगू नका नाहीतर जीवे मारून टाकीन तुम्हाला अशी धमकी दिली होती त्यांना ..इतक्या लांब जावून हात हलवत परतणे आम्हाला मानवणारे नव्हते ..आता कुठेतरी मुक्काम करून त्याच्या घरी परतण्याची वाट पाहणे भाग होते ..त्या छोट्या गावात कोणतेही लॉज नव्हते ..शेवटी पहाटे तीन वाजता आम्ही तेथून जवळ असलेल्या दुसऱ्या गावी जावून तेथील लॉज मध्ये एक खोली घेतली ..तीनचार तास आराम करावा म्हणून मुक्काम केला तेथे .
( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा